शनिवार, ५ एप्रिल, २००८

अति तेथे माती

क्रिकेटचा अतिरेक होत चालला आहे. भारतीय क्रिकेट संघाला उसंत काही मिळत नाहीये. ऑस्ट्रेलियाहून परत आल्यावर २-३ आठवड्यातच परत आता दक्षिण अफ्रिकेशी सामने सुरू झालेत. चांगल्या क्रिकेट खेळाडूंची कारकीर्द १०-१२ वर्षांची असते. जर खेळाडू सामान्य दर्जाचा असेल तर बरीच कमी. ह्या छोट्या कारकीर्दीत जितके म्हणून सामने खेळता येतील तितके खेळून घ्यायचे असा साहजिकच प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असणार. पण त्यालाही काही मर्यादा हवी. प्रत्येक देशाला आपला संघ विजया व्हायला हवा असतो. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात तर प्रत्येक खेळाडूकडून क्रिकेटप्रेमींच्या प्रचंड अपेक्षा असतात. शिवाय आजकाल सामने खूप अटीतटीचे होतात; टेस्ट क्रिकेट असो की एक-दिवसीय सामने. ह्या खेळात प्रत्येक खेळाडूची सर्व शारिरीक आणि मानसीक शक्ती पणाला लागते. एका मागोमाग चालू असणाऱ्या सामन्यांसाठी आपली शारिरीक आणि मानसीक क्षमता टिकवून ठेवणे कठीणच. शिवाय क्रिडांगणावर आणि बाहेर होणाऱ्या दुखापतींची टांगती तलवार आहेच. आघडीच्या बॉलर्सपैकी रुद्रप्रताप सिंग, मुनफ पटेल, इर्फान पठाण, श्रीसंत, झहीर खान ह्यापैकी कोणीही फार काळ आपले स्थान संघात टिकवून ठेवू शकलेले नाही त्याला वरील परिस्थितीच कारणीभूत आहे. फलंदाजांचीही स्थिती काही फार वेगळी नाही. तेंडुलकरलाही आता वारंवार जांघेतील दुखापतीमुळे विश्रांती घ्यावी लागत आहे. संघातील खेळाडू सतत बदलत राहिले की संघालाही स्थैर्य नाही आणि त्याचा परिणाम अखेर संघाच्या कामगिरीवर होतो. अहमदाबादच्या सामन्यात भारतीय संघाने जो सपाटून मार खाल्ला तो ह्याच कारणाने आहे असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते?

1 टिप्पणी:

Ameya Girolla म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.